सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली, कोयना धरणात 68.9 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली,
कोयना धरणात 68.9 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सातारा दि. 10 : कोयना धरणात आज 69.17
टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 69.08 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 24 नवजा येथे 50 व महाबळेश्वर येथे 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा २४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला २७२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे सकाळपर्यंत ५० आणि यावर्षी आतापर्यंत २९७८ तसेच महाबळेश्वरला ५० व जूनपासून २९१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी खूपच पाऊस कमी आहे. आता पावसाळ्याचे थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. या दिवसांत येथील पाऊस वार्षिक सरासरी गाठतो की नाही ते लवकरच समजणार आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १६३१० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७४.२९ टीएमसी इतका झाला होता. तसेच २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास सव्वा टीएमसीने वाढ झाली. मागील काही दिवसांचा विचार करता कोयना धरण पाणीसाठ्यात कमी कमी वाढ होताना दिसून येत आहे

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 6.96 (59.56), धोम -बलकवडी- 3.31 (83.49), कण्हेर – 6.83 (71.16), उरमोडी – 8.05 (83.40), तारळी- 3.96 (67.78), निरा-देवघर 6.27 (53.44), भाटघर- 15.54(66.12), वीर – 8.20 (87.12).

ग्लोबल न्युज नेटवर्क: