‘उप’ लावायचं राहून जात, चंद्रकांत पाटलांनंतर आणखी एका भाजप नेत्याची खदखद बाहेर

 

जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी आदर आहे. आजही मी मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय.. .असं मेसेज करून जातो. पण त्याला आता उप लागलेलं आहे, हे विसरतो. जनतेच्या मनातली भावना कुणीही काढू शकत नाहीत. आजही राज्यात देवेंद्र फडणवीसांचं एककलमी नेतृत्व आहे, असं वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर आता 21 दिवस उलटत असतानाही भाजपच्या नेत्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांच्या मनातील खदखद अजूनही शमलेली नाही का, असा सवालही यानिमित्ताने विचारला जात आहे.

राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले, ‘ जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी भावना आहे. मी ही मेसेज करताना करून जातो मुख्यमंत्री महोदय.. पण त्याला आता उप लागलेलं आहे. जनतेच्या मनातली भावना कोणी काढू शकत नाही. मात्र राज्यात एककलमी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसचं आहेत..असं अनिल बोंडे म्हणाले.

डेबिट-क्रेडिट कार्ड चोरीला गेल्यास त्वरित करा हे काम

‘दुःख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला पण.

 

Team Global News Marathi: