“अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं, ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत” अमित शाह यांच्या विधानावर नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह

 

नवी दिल्ली | भाजप नेते आणि गृह्मणतरी अमित शहा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नवा वाद अंगावर ओढवून घेतला आहे. प्रकरण असे की, पंतपोराधन मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद टीव्हीतर्फे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीची भरभरून स्तुती केली आहे. त्यासोबत या मुलाखती दरम्यान, त्यांनी ‘अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

रविवारी झालेल्या या मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं अस संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत, असं विधानही केलं आहे. या मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं मोठं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल?

ते पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुलं शाळेत न जाण्याचं प्रमाण जास्त होतं. मोदी यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम राबवली. त्यांनी पालकांची एक समिती तयार केली. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. याचा परिणाम असा झाला की, शाळेबाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरुन एक टक्क्याच्याही खाली आले.

Team Global News Marathi: