उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!;

 

रास्तव्रदुईचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाढ आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच मलिक यांनी लागलेल्या आरोपानंतर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. याच मुद्द्यावरून रुजतील राजकीय वातावरण चागंलेच तापलेले दिसून येत आहे, याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी थेट पवार-ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकीकडे समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना आता भाजपचे वानखेडेंची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वानखेडे प्रकरणावरून थेट ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे’, असं म्हणत किरीट सोमय्यांनी आता महाविकासआघाडीच्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

‘हे प्रकरण निव्वळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते.’ तसंच, ‘ठाकरे सरकारची ही बदमाशी सुरु आहे. हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे. गेले १२ दिवस समीर वानखेडे दलित की मुस्लिम यावर वाद सुरु आहे. यामागचं कारण असं की अजित पवारांवर ११ दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना ह्या प्रकरणातून वाचवायचं आहे’, असं म्हणत सोमय्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: