“त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य येत नाही” फडणवीसांनी सांगितलं राजकारण

 

नागपूर | नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील विविध भागात फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.

फडवीसांच्या स्वागतासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. नागपूरला रवाना होण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य येत नाही” असं म्हणत फडणवीसांनी ‘राज’कारण सांगितलं आहे.

“माझ्यामध्ये उत्साह तर आहेच पण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळेच ठीक आहे. सर्वांचाच उत्साह असल्याने मी स्वागत स्वीकारणार आहे. पण त्यानंतर लगेच कामाला लागणार आहे. कोणाची नाराजी नाही. सर्वांना समजतं की काही ना काही त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य आणता येत नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: