‘त्या’ दोन बैलांनाही नोटीस द्याव्या लागतील, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला प्रत्युत्तर

 

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० अशा एकूण ५० आमदारांनी एकत्र येत भाजपसोबत सत्ता स्थापन केली.त्यानंतर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या सर्व आमदारांवर प्रत्येकी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरुन, आता चांगलंच राजकारण तापलं आहे.

अशातच शिंदे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून शिंदे गटानेही अब्रु नुकसानीची दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासंदर्भात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राऊत यांच्या जामीनावर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी त्यांना अब्रुनुकसानीच्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही प्रतिक्रिया देताना त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

चांगलंय अजून त्यांना खूप नोटीसा द्याव्या लागतील. बैलपोळ्यादिवशी दोन बैलांवर जे होतं, त्यांनाही नोटीस द्याव्या लागतील. आम्हाला सर्वांना खुशाल द्या, महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला नोटीस द्या, ज्या ३३ देशांनी नोंद घेतली त्या देशांनाही नोटीस द्या, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या अब्रु नुकसानीच्या दाव्यावर आपलं मत व्यक्त केलं.

Team Global News Marathi: