आमदार आणि खासदार व्हायला अक्कल लागत नाही, सदाभाऊ खोतांचे अजब वक्तव्य

आमदार आणि खासदार व्हायला अक्कल लागत नाही. मी राज्यमंत्री झाल्यावर मला कळलं की निवांत झोपा काढल्या तरी चालते, असे धक्कादायक विधान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ते सांगली येथे बोलत होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या कार्यक्रमात अजब वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, त्यांचे हे वक्तव्य नेमकं खोत यांनी कोणासाठी उपदेशून बोलत होते या विषयाने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

राजकारणात लोकं जितकं मिळतं तितकं घेतात. अडीच वर्षाच्या पदाचे काही खरं नसते. अनेक लोकांना शब्द दिला जातो, तुला आमदार करतो. राजकारणात तुम्ही झोपून राहिलात तर लोक गळा दाबून जातात, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडं आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे.

 

Team Global News Marathi: