काँग्रेस सोडून जाणारे संघाचे होते, काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना राहुल गांधी यांनी लगावला टोला |

 

नवी दिल्ली | देशात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता पक्षांतर करणाऱ्या या माजी काँग्रेस नेत्यांना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संघ विचाराने प्रेरित असल्याचा ठपका त्या नेत्यांवर ठेवला आहे.

ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचं स्वागत आहे. काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचं आवाहन केलं.

तसेच भाजपाकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका. कोरोना काळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असं राहुल यांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: