सचिन पायलट काँग्रेसमध्येच हा मराठीं चेहरा ठरला गेम चेंजर…..!
राजस्थान काँग्रेस मध्ये बंडाचे शिंख फुकून काँग्रेस विरोधात भूमिका मांडणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले बंड मागे घेतले आहे. काल त्यांनी काँग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांची भेट घेऊन चर्चा केल्यनानंतर आपले बंड मागे घेत असल्याचे घोषित केले. पायलट यांच्या घोषणेनंतर हा राजस्थामध्ये भाजपाला मोठा धक्का मनाला जात आहे.
मात्र सचिन पायलट यांचे बंड मागे घेण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून समजले जाणारे महाराष्ट्रातले राजीव सातव यांनी या प्रकरणात प्रमुख भूमिका निभावलेली आहे. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना पायलट यांची समजूत काढण्यासाठी
राजस्थानला पाठवले होते. तसेच ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.
राजीव सातव हे सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. काँग्रेस पक्ष आणि पायलट यांच्यातील ते दुवा होते. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी सातव यांना राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आणि त्यांनी आपली कामगिरी सफल करून दाखवली होती.
सचिन पायलट म्हणाले की, अशोक गेहलोटनंतर नजीकच्या काळात ते राजस्थानचे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा हाय कमांडने जाहीरपणे करावी. गांधी कुटुंबियांना असेही त्यांनी सांगितले की जर हे शक्य झाले नाही तर त्यांना दिल्लीत राष्ट्रीय सरचिटणीसपद द्यावे. यासह गहलोत सरकारमध्ये दोन ज्येष्ठ आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे.
सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक अन्य आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी, कोणत्याही मंडळाची कमिशन, विश्वस्त किंवा महामंडळाची मागणी केली. पक्षाच्या नेतृत्त्वाशी वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या पायलट यांनी जाहीरनाम्यात राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होईल, अशी जाहीरपणे घोषणा करून पक्षामध्ये त्यांचा सन्माननीय परत जाण्याची अट देखील केली.
राहुल यांनी हा प्रस्ताव दिला
राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांचे काळजीपूर्वक ऐकले आणि आपल्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना राजस्थान सरकारमधील राजस्थान कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदावर परतण्याची ऑफर देखील दिली. सरकारच्या कामांसाठी पायलटसमोर समिती बनविण्याचा प्रस्तावही राहुल गांधींनी ठेवला.