राज्यात आता पुन्हा ‘लॉकडाऊन’ची गरज नाही, पण… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी जनतेशी संवाद साधला. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज नसून, पण कोरोनाचा धोका संपलेला नाही हे विसरून चालणार नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात पुर्ण नाही पण बऱ्याच प्रमाणात या संसर्गाला अटकाव घालण्यात यश आलं आहे. आता तर थंडीचे दिवस सुरू झाले आहे. या मौसमात सर्दी, खासी होण्याची दाट थक्यता असते. त्यामुळे उपचार घेण्यापेक्षा आपली काळजी घ्या. पुढील 6 महिने मास्क बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना तसेच, सध्या वादात सापडलेल्या कांजूरमार्गच्या मेट्रो 3 कारशेडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. याचवेळी मेट्रो कारशेडवरून सरकारला वेळोवेळी लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं आहे. ‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे

समृद्धी मार्गावरचा नागपूर – शिर्डी टप्पा एक महिन्यात पूर्ण होईल. आर्थिक संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. धीम्या गतीने येत आहेत परंतु आपण हताश होऊन बसलो नाही, पुढे जात आहोत.

मला अहंकारी संबोधले जाते… माझ्या महाराष्ट्रासाठी आहे मी अहंकारी! का नसावं? जे जनतेच्या हितासाठी, ते करण्याचा प्रयत्न करत आहे.

राजकीय हल्ले परतवत एक वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलं. 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारने आपल्या साथीने आणि आशीर्वादाने एक वर्ष पूर्ण केलं. अनेकजण डोळे लावुन बसले होते आता पडेल… मग पडेल. परंतु विकास करत आपण एक वर्ष पूर्ण केलं. ते देखील जागतिक शतकाने येणार्‍या आपत्तीच्या काळात!

लग्नसराई सुरू झाली की ‘यायच हं!’ असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे.

नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंत कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे.

कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे. युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून का करावा लागला? त्याची कारणे आहेत. सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे.

देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितलं आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल.

पावसापूर्वी पेरता पक्षी येतो आणि पेरणीची साद घालतो त्याचप्रमाणे प्रत्येक पावलावर मी तुम्हाला सावध रहा सांगत आलो आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती… मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे.

केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? कांजुरची 40 हेक्टर जागा आहे, म्हणजे 25 आणि 40 असा फरक आहे. कांजुरचा गवताळ किंबहुना ओसाड जागा आहे. कांजुरला 3 – 4 – 6 या तीन लाईनसाठी आपण कारशेड करू शकतो.

प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला तर आपल्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही. मी ज्या खुर्चीत बसलोय, त्या खुर्चीच महत्त्व मला माहित आहे. वैयक्तिक आवड-निवड ठेवत नाही, हट्टीपणा नाही, परंतु विकासकामांसाठी पाठपुरावा मी करणारच.

ग्लोबल न्युज नेटवर्क: