जेव्हा मुंबई महापालिकेने तुझ्या घराचा एक कोपरा तोडला तेव्हा तू जग डोक्यावर घेतलं
ग्लोबल न्यूज: सिनेबाहिनेत्री कंगना रानौत हिने शेतकरी आंदोलनावर वक्तव्य करत नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. यापूर्वी सुद्धा कंगनाने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले होते. त्यातच आता पंजाबचे प्रसिद्ध गायक जस्सीने कंगना रानौत हिच्यावर ट्विट करून पलटवार केला आहे. सध्या हे ट्विट जोरदार वायरल होत आहे.
मोदी जी किती स्पष्टीकरण देतील, किती वेळा समजावतील? शाहीन बागेत रक्ताचे पाट वाहणाऱ्यांनाही पूर्णपणे माहीत होते की त्यांची नागरिकता कोणीही घेत नाही. पण तरीही त्यांनी दंगली करून देशात दहशत माजवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच पुरस्कार जिंकले. या देशाला धर्म आणि नैतिक मुल्यांची आवश्यकता आहे. असे ट्विट कंगनाने केले होते.
यावर आता गायक जस्सीने ट्विट करून कंगनाला जोरदार प्रतिउतर दिले आहे. निर्लज्जपणाचीही काही मर्यादा असते ‘जेव्हा मुंबई महापालिकेने तुझ्या घराचा एक कोपरा तोडला तेव्हा तू जग डोक्यावर घेतलं. इथे तर शेतकर्यांच्या जमिनींचा त्यांच्या आईचा प्रश्न आहे आणि ही बोलते की समजून घ्या.. जर तू शेतकर्यांच्या हक्काबद्दल बोलू शकत नाही तर किमान त्यांच्या विरोधात तरी बोलू नकोस. निर्लज्जपणाचीही एक मर्यादा असते.