सुखाचा उगम आपल्यातच आहे ; ते जगाकडून मिळत नसते…कारण…

सुखाचा उगम आपल्यातच आहे ; ते जगाकडून मिळत नसते…कारण…

सुलभा घोरपडे


सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे.

जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत.

फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्‍न केला, तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का, की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? तसे, जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार.

Advertisement


म्हणजे, सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची ?

निसर्गाने मनुष्याला बरेवाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे. ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून, आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्‍न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही.

सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या; आणि जगाकडून सुख मिळेल, ही कल्पनाच चुकीची आहे. ‘तुझे आहे तुजपाशी । परि जागा चुकलासी ॥’ आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे ?

मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले….

सुखी,आनंदी राहण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
१) भूतकाळात काय झाल हे विसरून जा.
२) आजचा दिवस आनंदात घालवा.
३) उद्या भविष्यात काय होईल याची चिंता करू नका.

आपल्या भविष्यात काय घडेल याचा नकारात्मक विचार न करता शांतपणे ,संयमाने निवांत रहा.तुमच्या आयुष्यात जे काही होईल ते चांगलंच होईल ही भावना मनात सतत जागृत ठेवा.मग पहा आपल जीवन चांगल्या प्रकारे सार्थकी लागले आहे हे समजेल.

लग्नाची पहिली रात्र…वाचा अस काय घडलं की…

साभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: