विरोधी पक्षाने विरोध करणारी विधानं केल्याने महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि घट्ट होतेय – संजय राऊत
मुंबई – कृषी विधयक कायद्यावर अमित शहांनी शेतकऱ्यांना दिलेलं फायद्याचं आश्वासन हे बरोबरच असेल असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
याचसोबत त्यांनी होऊन गेलेल्या सरकारनेही शेतकऱ्यांसाठी महत्वाची कामे केली आहेत असं मत मांडलं.मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.विरोधी पक्षाने विरोध करणारी विधानं केल्याने महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि घट्ट होतेय,असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.