ग्लोबल न्यूज: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जग आणि भारत ज्या कोविड लसीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी आणखी तीन महिने प्रतिक्षा करावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रविवारी सांगितले की,कोविड -१९ ही लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस उपलब्ध होईल. ते म्हणाले की सरकार उच्च जोखमीच्या परिस्थितीसाठी आपत्कालीन अधिकारावर विचार करीत आहे. लसच्या सुरक्षिततेवर काही प्रश्न असल्यास, मी त्याचा पहिला डोस स्वत: घेईन.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले की, लस सुरू होण्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, त्यामुळे 2021 च्या पहिल्या तिमाहीत ते तयार होईल अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना ही लस सर्वात आधी दिली जाईल, ही लस देताना लोकांची आर्थिक परिस्थिती आडवी येऊ देणार नाही.
केंद्रीय मंत्री म्हणाले की सरकार लसींच्या मानवी चाचण्याबाबत पूर्ण खबरदारी घेत आहे आणि सर्व मानकांचे पालन करीत आहे. डॉ हर्ष वर्धन म्हणाले की,नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वात गठित देशातील तज्ञ लोकांची समिती कोविड -१९ लस, अधिक लोकांना कशी देता येईल यासाठी धोरण आखत आहे.