मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर साधलेल्या निशाण्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये चालू झालेले शाब्दिक युद्ध अद्याप चालूच आहे. अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा केल्याने पेटलेल्या वादात आता शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपा-शिवसेना शाब्दिक वाद चालूच, नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना मानसिक आरोग्य सांभाळण्याचा सल्ला
#शिवसेना /२ मनस्वास्थ चांगले राहते.
हो शिवसेनाच रुग्णवाहिका व अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका;आपल्या नावात"अ"च महत्व आहे ते निघाले तर"मृता" राहिल,
शिवसेनेची काळजी करू नका,आपले मानसिक स्वाथ्य
जपा"अ"मंगल विचार मनात आणणे"अ"योग्य बरे का !@fadnavis_amruta— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
नीलम गोऱ्हे यांनी केली शाब्दिक कोटी
त्यांनी शाब्दिक कोटी करत अमृता या शब्दातील अ या अक्षराचे महत्व अधोरेखित करत म्हटले आहे की अमृता फडणवीसांनी दिवाळीच्या दिवशी अमंगल विचार मनात आणू नयेत आणि शिवसेनेला अभद्र नावे ठेवू नयेत. त्यांच्या नावातील मृता या शब्दावर कोटी करत त्यांनी म्हटले आहे की अमृतावस्थेत जाऊ नका, त्यासाठी मोदी सांगतात त्याप्रमाणे अधूनमधून योगा करण्याचा सल्लाही गोऱ्हे यांनी दिला आहे.
शिवसेनेला दिली रुग्णवाहिकेची उपमा
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की शिवसेना ही रुग्णवाहिका आहे, ज्याची आठवण अंतिम क्षणी हमखास होते. अमृता या नावातून अ हे अक्षर काढून घेतल्यास फक्त मृता राहील असा निशाणा साधत त्यांनी अमृता फडणवीसांना शिवसेनेचा काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अ या अक्षरावरून दिवाळीत असे अमंगल विचार मनात आणणे अयोग्य असल्याची कोटीही त्यांनी केली आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1326787926823415813?s=19
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी वाईटच झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा करत म्हटले होते की शवसेनेने बिहारमध्ये आपल्याच सहकाऱ्यांचे जीव घेतले. त्यांनी ट्वीट करत असेही म्हटले होते की भले महाराष्ट्र कुठेही पोहोचलेला असो, पण बिहारला योग्य ठिकाणी आणल्याबद्दल धन्यवाद.