“ठाकरे सेनेला राजकारणात कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय ही खरी शोकांतिका”

 

ठाकरे सेनेला आता एका मांडीवर राष्ट्रवादीनं बसवलंय तर दुसऱ्या मांडीवर काँग्रेसनं बसवलंय. ठाकरे सेनेला दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष उघडपणे राष्ट्रवादी शिवसेना असल्याचं विधान केले आहे.ठाकरे सेनेला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय. ज्या बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे इतरांचा आधार घ्यावा लागतो ही खरी शोकांतिका आहे अशा शब्दात मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर टिक केली आहे.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी जेव्हा चर्चा सभागृहात सुरू होती. तेव्हा या प्रकरणात जी नवीन माहिती समोर आली आहे. पूर्वीच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या नव्हत्या किंवा जाणीवपूर्वक आणल्या नाहीत. त्या माहितीची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं. तपासून घ्यायच्या अगोदरच नाना पटोले कुठल्या आधारे माहिती खोटी असल्याचा दावा करतात. तपास यंत्रणेचा अहवाल पुढे आल्यावर त्यावर भाष्य करता येईल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं.

तर चिखलफेक तुमचे तीन पक्ष करतायेत. तुमचीच महाविकास आघाडी आहे. धोरणात्मक, राजकीय विषयांवर सभागृहात चर्चा करायची असेल. काही सकारात्मक विषय मांडायचे असतील. सकाळी ८ वाजल्यापासून रोज टीव्हीवर येऊन बोलतात. साडेतीन महिन्याचा कालावधी सोडला तर रोज त्याच विषयांवर बोलतात. लोकं राऊतांचे एका कानाने ऐकतात अन् दुसऱ्या कानानं सोडून देतात असा टोला शंभुराज देसाईंनी संजय राऊतांना लगावला.

Team Global News Marathi: