‘राज्याचे वाटोळे महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी केले’

 

पुन्हा एकदा एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारसोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे ते कार्यक्रमात म्हणाले,”ठाकरे सरकार बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचे सरकार विजयी झाले की हे फटाके फोडतात.

अन् केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द केले तेव्हा सुद्धा राज्य सरकार तरीही हे फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करतात. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे हे मांजर आहे.’अस म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. या टिकेमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोड फुटणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे की,’ राज्याचे वाटोळे महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी केले. ठाकरे सरकार आपले अपयश लपविण्यासाठी अटापिटा करतांना दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांना यशस्वी तोडगा काढता येत नाही.’ असेही विखे पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: