राजीनाम्याच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

राजीनाम्याच्या चर्चेवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

पक्षांतर्गत गटबाजीमुळे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होत होती. थोरात यांनी समोवारी दिल्लीत जाऊन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याचंही बोलले जात आहे.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी या चर्चांवर मौन सोडलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मात्र यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे. “मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली असे त्यांनी बोलून दाखविले.

“माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असे सांगितले होते. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असेही सांगितले होते.

तसेच ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचं विभाजन करायचं असेल तर हरकत नाही असं स्पष्ट केलं होतं. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगितली होती. पण अचानक हा मुद्दा का आला याची मला कल्पना नाही. पण जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: