भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर

भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, जयंत पाटील करणार योग्य वेळी नावे जाहीर

भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्‍य वेळी त्‍यांची नावे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जाहीर करतील, अशी माहिती अल्‍पसंख्यांक मंत्री तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

 

मलिक यांच्या माहितीमुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपचे नेमके कोणते आमदार फुटणार याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे.

महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात आघाडी सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपच्या काही नेत्‍यांकडून देण्यात आले. मात्र ते सर्व फोल ठरले. नुकत्‍याच झालेल्‍या विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत भाजपला मोठा धक्‍का बसला व आघाडीने यश मिळवले. त्‍यानंतर राजकीय चित्र हळूहळू बदलायला सुरूवात झाली आहे.

आघाडी सरकारचा भाग असलेले राष्‍ट्रवादीकडून भाजपाचे काही आमदार फुटणार असल्‍याचा दावा सातत्‍याने करण्यात येत आहे. नुकत्‍याच झालेल्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट विधानसभेतच भाजप नेत्‍यांनाही इशारा दिला होता. फक्‍त चार महिने थांबा, आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देउन परत आमच्याकडे येतात की नाही हेच बघा असे अजितदादा म्‍हणाले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: