सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पुणे (प्रतिनिधी) – माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 (अ) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे यापुढे सोशल माध्यमांवर व्यक्त होनार्यांवर पोलिसांना कलम (66) अ नुसार कारवाई करता येणार नाही.
फेसबुक ट्विटर , लिंक्ड इन,व्हाॅट्सअॅप यासारख्या माध्यमांवर कोणतिही पोष्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 नुसार त्यांच्यावर कारवाई केली जात होती. या प्रकरणी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आयटी कायद्यातील कलम 66 अ या कायद्याला आव्हान दिले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विधी आयोगाचे सदस्य अॅड. विजय सावंत यांनी माहिती दिली.
सनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे कलम नाकरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा निष्कर्ष नोंदविला. सोशल माध्यमांवर मत मांडणार्या काही नागरिकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता.
हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभुत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणार्या कलम १९(१) अ चे उल्लंघन करणारे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमुद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहणार आहे. सोशल माध्यमांवर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही.
ADV विजय सावंत, सदस्य, विधी आयोग