अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी आमदार राम कदम यांचे सिद्धिविनायकाला साकडे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आर रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्याच्या सोबत दोघांना पनवेल पोलिसांनी अटक केली होते. अर्णब यांच्या अटकेनंतर राज्यातील तसेच दिल्लीतील भाजपा नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता भाजप आमदार राम कदम आता सिद्धिविनायकाला साकडे घातले आहे.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. अटकेनंतर आज त्यांची रवानगी मंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी आज घटकोपर येथील निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्दिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा केली असून अर्णब यांच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, दोन दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरु केलं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.