शिवसेनेआधी काँग्रेसच पाडणार महाविकास आघाडी सरकार?

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे, त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला एच.के.पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत. या बैठकीत काँग्रेस मोठा निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे, पण त्यासाठी पहिले मुंबईत या आणि अधिकृत मागणी करा. तुमच्या मागणीचा नक्की विचार करू, अशी अटही संजय राऊत यांनी ठेवली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संवाद साधला, यात ते महाविकासआघाडीमधून बाहेर पडण्याबाबत काहीही बोलले नाहीत, मग 20 तासांमध्ये अचानक असं काय झालं? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पडला आहे. आता वेळ निघून गेली दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मात्र संजय राऊत यांनी संजय राऊत यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता वेळ निघून गेली आहे, गाडी खूप पुढे निघून गेली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: