शिवसेना संजय राऊत यांच्यामुळेच फुटली – आ. शंभूराज देसाई

शिवसेना संजय राऊत यांच्यामुळेच फुटली – आ. शंभूराज देसाई

सातारा : खा.संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही असे म्हणत या दोन्ही दिग्गज नेत्यांवर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घणाघाती टीका केली आहे.

राज्यामध्ये बंड झाल्यानंतर या बडांमध्ये शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची फारकत घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी नंतर आज आमदार शंभूराजे देसाई हे साताऱ्यात आले होते त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत आपण शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो याबद्दलच्या अनेक घटना पत्रकारांसमोर सांगितल्या.

त्यानंतरच त्यांनी खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही असे देखील आमदार शंभूराज देसाई यांनी बोलताना सांगितला आहे.

राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील असे भाकीत करणाऱ्या खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या भागीतला देखील सत्य नसून शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही हे अनेकदा अनुभवायला आल आहे असे म्हणत शंभूराज देसाई यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: