शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारणावर कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा

x

एकनाथ शिंदे यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवीताला धोका असतानाही त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांनी केला होता.

तसेच त्यांनी केलेल्या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले तर आता शंभुराज देसाईं यांनी मात्र दुजोरा दिला आहे. त्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले होते. केवळ त्यांनाच नाहीतर त्यांच्या कुटुंबियांनाही धमकी देण्यात आली होती. असे असताना सुरक्षा देणे महत्वाचे होते. मात्र, याबाब वर्षावरुन विचारणा झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक दिली जात होती याचे दाखलेही त्यांच्या गटातील आमदारांनी देण्यास सुरवात केली आहे.

सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली. यामध्येही त्यांना सुरक्षेची गरज पाहिजे असाच सूर उमटला होता.

तसेच त्याअनुशंगाने अधिकऱ्यांशी बैठक पार पडत असताना सकाळी 8 ते साडे आठच्या दरम्यान आपणास वर्षा निवसस्थानावरुन फोन आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षतेबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना सुरक्षतेची गरज नसल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय आहे. हे माहित नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

‘शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार’

हिंदुत्वाचं प्रतीक हातात दिसलं नाही, तुम्ही भगवा सोडलाय का?

Team Global News Marathi: