अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात शुक्रवारी वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने १० कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता. याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे.
संभाजीराजे म्हणाले की, मागील आठवड्यात मराठवाडयातील दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधांवर उतरून व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या परिस्थीतीची माहिती दिली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पैसे उभे करता येणे शक्य आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर सात दिवसांत केंद्राचे पथक येऊन नुकसानीची पाहणी करते. त्याअंतर्गत कर्ज ही काढता येते. शेतकरी जगावा यासाठी कर्ज काढल्यास हरकत काय आहे? असा प्रश्न खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.