सरकार पाडण्यासाठी 3 हजार कोटी एकनाथ शिंदेनी आणले कुठून?

 

मुंबई | तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना सरकार पाडण्यासाठी यांनी 3 हजार कोटी रुपये लावले ते आणले कुठून? असा सवाल परभणीचे शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांनी विचारला आहे. शिवाय पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय

मुंबईत घडलेल्या घडामोडी नंतर डॉ राहुल पाटील काल परभणीत दाखल झाले, यावेळी त्यांचा शिवसेनिकांनी सत्कार केला. शिवसेनेचे आमदार मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मात्र परभणीचे सेना आमदार डॉ राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले.

या सर्व घडामोडी नंतर काल ते परभणीत आले असता त्यांच्या निवासस्थानी शिवसेनिकांनी त्यांच्या सत्कारा साठी मोठी गर्दी केली होती. यावेंळी बोलताना त्यांनी ही बंडखोरी करण्यासाठी 3 हजार कोटी खर्च केला हे 3 हजार कोटी आले कुठून? असा सवाल करत ज्या भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत कुणी कितीही काही केलं, तरी मुंबईत महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता आम्ही आणू असा विश्वास ही व्यक्त केलाय.

Team Global News Marathi: