केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी मागच्या २ महिन्यापासून दिल्लीत आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा पाठिंबा मिळत आहे. त्यात रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला दर्शवलेल्या पाठिंब्यानंतर मोदी सरकारच्या बचावासाठी सचिन तेंडुलकर पुढे आला. त्याने केलेल्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता संभाजी ब्रिगेडने एक पाऊल पुढे जात सचिनकडून भारतरत्न परत घेण्याची मागणी केली आहे. ज्या सचिनने आपल्या खेळामुळे संबंध देशवासीयांची मने जिंकली, त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर शेतकऱ्यांनी पेरलेच नाही, तर सेलिब्रिटी काय खातील? असा प्रश्नही यावेळी संभाजी ब्रिगेडने विचारला आहे.
संभाजी ब्रिगेडने आरोप केलाय की, मागचे 70-71 दिवस झोपलेला सचिन आता अचानक जागा कसा झाला आहे. राज्यसभेत खासदार असताना त्यांनी सभागृहात हजेरी नोंदविलेली नाही. साधा एक प्रश्नही विचारलेला नाही आणि आता शेतकरी आंदोलनावर भाष्य करत आहेत. सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्यायला. परंतु उलट शेतकरी आंदोलनकांविरुद्ध त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांचा भारतरत्न परत घेण्यात यावा असे मत संभाजी ब्रिगेडने मांडले आहे.