दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय, नाव न घेता चव्हाण यांनी लगावला बोंडेंना टोला !

 

नांदेड | त्रिपुरातील कथित घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. नांदेडमध्ये माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी बोलताना बोंडे यांनी काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केला होता. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं.

यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे. आता मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला ते काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: