सुशांतच्या घरी घटनेचं रिक्रिएशन, जाणून घ्या काय असतं क्राईम सीन रिक्रिएशन
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. याप्रकरणी आता घटनास्थळी रिक्रिएशनद्वारे या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.
घटनेच्या रिक्रिएशनद्वारे सुशांत सिंह प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची तयारी
न्यायालयीन लढाईदरम्यान सीबीआयचा तपास सरकत आहे पुढे, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांवर याआधीच एफआयआर दाखल
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करावा की सीबीआयने यावर दीड महिना चालला वाद
नवी दिल्ली: १४ जून २०२०च्या दुपारी मायानगरी मुंबईमधून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युची वाईट बातमी आली. बातम्यांमध्ये सांगण्यात आले की त्याने आत्महत्या केली. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्येसारखे पाऊल उचलेल यावर कुणाचाही विश्वास बसला नाही . याप्रकरणी तपासाबाबत अनेक वादविवाद झाले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआय या गूढ प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहे.
मुख्य प्रश्न हा आहे की सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला (suicide or murder?). हेच कोडे सोडवण्यासाठी सीबीआयची टीम घटनास्थळी झालेल्या प्रकरणाचं रिक्रिएशन (crime scene recreation) करेल. त्यामुळे हा प्रकार नक्की काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे.
का आणि कसं केलं घटनास्थळाचं रिक्रिएशन?
घटनास्थळी रिक्रिएशन तेव्हा होते जेव्हा नेमके काय घडले याबद्दल स्पष्टता नसते. म्हणजे पीडित व्यक्तीच्या कुटुंबाकडून जेव्हा तपास व्यवस्थित होत नसल्याचा किंवा पोलिसांना प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी पुरावे मिळत नसल्याचा आरोप केला जातो. अशावेळी घटनास्थळी रिक्रिएशन केलं जाते. यात नक्की काय झाले, कधी झाले, कुठे झाले, कसे झाले, कुणी केले आणि का केले अशा सिद्धांतांवर काम केले जाते. या प्रक्रियेत ज्यावेळी घटना घडली, अगदी त्याचवेळी आणि त्याच ठिकाणी पोलीस आरोपीला घेऊन जातात आणि पुन्हा एकदा घटनेच्या जागी रिक्रिएशन करतात.
गुंतागुंतीच्या प्रकरणात घटनास्थळाची पुनर्निर्मिती हा रामबाण उपाय
पोलीस किंवा कोणत्याही तपास यंत्रणेकडून घटनास्थळाची पुनर्निर्मिती केली जाणे ही सामान्य प्रक्रिया आहे. याद्वारे तपास यंत्रणा प्रत्येक तपशील आणि पुरावे न्यायालयासमोर मांडते जेणेकरून आरोपीला शिक्षा देण्यात कोणतीही कसर राहणार नाही. घटनास्थळाची पुनर्निर्मिती ऐकायला सोपी वाटते, पण प्रत्यक्षात मात्र हे अवघड आहे. एकाप्रकारे ज्या परिस्थितीत आरोपीने गुन्हा केला असल्याची शक्यता असते तशीच परिस्थिती तयार केली जाते.
घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे घटना कशी झाली असावी हे ठरवले जाते. पुनर्निर्मितीदरम्यान मिळालेल्या पुराव्यांची वैज्ञानिक चाचणी केली जाते. यासोबतच प्रकरणाशी निगडीत असलेल्या सर्व माहितीचा वेगवेगळ्या बाजूंनी विस्तृत अभ्यास केला जातो आणि तथ्यांवर आधारित निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.