“वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा” – अतुल भातखळकर

“वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा” – अतुल भातखळकर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लाक लोकमत चर्चेत आघाडीचे सरकार पाडण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप लगावला होता. या त्यांच्या वक्त्यव्यावरुन गृहमंत्र्यांवर जोडणे टीका विरोधकांनी केली होती. यावर आता भाजपाचे आमदार आतून भातखळकर यांनी टीका केली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी सुशांतप्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर निशाणा साधला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.

“या गृहमंत्र्यांच्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालीयन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दोन महिने होऊनही एक इंचही पुढे सरकता आलं नाही त्यांना राज्य सरकार पाडण्याचं बळ कुठून आलं? त्यामुळे या अधिकाऱ्यांनी असं काही केलं असेल तर त्यांच्यावर जरुर कारवाई करावीच, पण या वाचाळवीर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबोडतोब राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे,” असंही मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: