शेतकऱ्यांचे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे, राजू शेट्टी यांची टीका

महाविकास आघाडी सरकारचे मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारमध्ये मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चँगलेच खडेबोल सुनावले आहे.

शेतकऱ्यांची वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे आघाडी सरकारला अशक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे राहिले आहे., अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्यसरकारवर केली.

राजू शेट्टी म्हणाले की, ‘ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले. अशा लोकांकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार आहे. परंतु त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही. अशी टिका भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांवर शेट्टी यांनी केली. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आली आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेने न्याय दिला आहे.

Team Global News Marathi: