राज ठाकरे यांच्यावर हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचा आरोप

 

संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी राज ठाकरे यांच्यावर हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचा आरोप केला आहे. जिथे जिथे खोटा इतिहास सांगितला, तिथे राज ठाकरेंनी समर्थन दिले आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुपारी घेऊन ते काम करतात. त्यांनी चित्रपटाला समर्थन देऊन खोटा इतिहास पसरवण्याची सुपारी घेतली आहे का? खोटा इतिहास दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी ते का उभे राहतात? असे अनेक प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

राज ठाकरेंनी आरएसएसची सुपारी घेऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट बाहेर आणला आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे काम केले. काही लोक न घडलेला इतिहास दाखवायचा प्रयत्न करत आहेत. विश्वासू सरदारांची बदनामी करण्याचे काम केले. खोटा इतिहास दाखवला जातो; तेव्हा फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे समर्थन करतात. ते कोणत्या मानसिकतेतून हे करतात? असेही त्यांनी विचारले. इतिहासाचे चित्रपट मालमसाला लावून दाखवले जाऊ नये. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी ब्रिगेडची बैठक आयोजित केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना राजकीय वर्तुळातून विरोध करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोपही केला होता. तसेच आंदोलने करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तर मनसेच्या नेत्यांनी हा चित्रपट पुन्हा सुरू केला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे तसेच संपूर्ण राज्यातील वातावरण तापले होते.

 

Team Global News Marathi: