३ मे पर्यंत राज्यातील मशीदींवरील भोंगे काढा, राज ठाकरे यांचे राज्य सरकारला अल्टिमेटम, मुस्लिम समाजालाही केले आवाहन
ठाणे: राज्यातील मशींदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू या भूमिकेचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. तसेच तीन मे पर्यंत या मशिदीवरी भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावूच असा अल्टिमेटमही राज ठाकरे यांनी दिला आहे.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टीका केली होती, तर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. आता राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. वर्षभरातील सणवार असेल तर लाऊडस्पीकर लावणे चुकीचे नाही असे राज ठाकरे म्हणाले परंतु वर्षभर भोग्यांवर अझान आणि बांग देणे चुकीचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
तसेच सर्वोच्च न्यायालयानेही यावर टिपण्णी केली आहे मग राज्य सरकार यावर का भूमिका घेत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. असे असले तरी सध्या रमजान सुरू आहे, ३ मे रोजी ईद आहे त्यानंतरही जर भोंगे दिसलेच तर आम्ही हनुमाच चालीसा लावणार असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच मुस्लिम समाजाने मशीदींवर स्वतःहून हे भोंगे काढावे असे आवाहनही त्यांनी मुस्लिम समाजाला केले आहे.
Loudspeakers in mosques should be shut till May 3rd otherwise, we will play Hanuman Chalisa in speakers. This is a social issue, not a religious one. I want to tell the state government, we will not go back on this subject, do whatever you want to do: MNS chief Raj Thackeray pic.twitter.com/H4ysJvCJym
— ANI (@ANI) April 12, 2022
वाचा राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मशीदीवरील भोंगे काढा राज ठाकरे यांचे मुस्लिम समाजाला आवाहन
आता फक्त हनुमान चालीसा म्हटले आहे माझ्या भात्यात अनेक बाण आहेत ते काढायला लावू नका
प्रत्येकांनी आपापला धर्म घरात ठेवावा, सणांच्या दिवशी आपण समजू शकतो,
केंद्र जर कोळसा देत नसेल तर राज्याने परदेशातून कोळसा आणावा, राज्य सरकारला टोला
परंतु वर्षाचे ३६५ दिवस हे नाटक चालणार नाही.
एसटी कर्मचार्यांच्या संपावर अजून तोडगा निघत नाहिये
जातीतून बाहेर आपण पडणार नाही तर आपण मराठी कधी होणार आणि जो मराठी होणार नाही तो हिंदू कधी होणार?
मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे कुठे गेले? – राज ठाकरे
बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचले. – राज ठाकरे
शरद पवार हे नास्तिक आहेत, ते देव धर्म मानत नाहीत – राज ठाकरे
कारण महाराजांचे नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत.
शरद पवार कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत.
संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना राष्ट्रवादीने जन्माला घातल्या- राज ठाकरे
संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?
पाकिस्तानी कलाकारांच्या ढुंगणावर लाथा मारणारी संघटना मनसे
सोनिया गांधी नको म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नंतर कृषीमंत्री झाले.
मुंब्र्यातून अनेक दशतवाद्यांना अटक,राज ठाकरे यांनी वाचली नावे.
नागाने फणा काढावा असा जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा
तीन तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे,
कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही, कुठलीही दंगल घडवायची नाही.
३ मे पर्यंत मशीदीवरील सर्व भोंगे काढा, राज ठाकरे यांचा अल्टिमेटम
यातून आम्ही बाहेर पडणार नाही, राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
कानांना त्रास होत असेल तर भोंगे उतरवलेच पाहिजे,
जर भोंगे उतरले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावणारच – राज ठाकरे
हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे.
अझानची गरज काय, रस्त्यावर नमाज कशासाठी – राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले लाव रे तो व्हिडीओ
राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री,
राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री
दोन अडीच वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भुजबळ यांचा पहिला शपथविधी.
भुजबळ यांच्या संस्थेत गैरव्यवहार केल्यामुळे तुरुंगात.
राष्ट्रवादी हा निवडून येणार्या नेत्यांची मोळी, शरद पवार हे त्याची रशी
मनसे हा दुसर्या पक्षांना विझवत नेणारा पक्ष
सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे सुळे वेगळे.
राज ठाकरे यांच्याकडून जयंत पाटील यांचा जंत पाटील असा उल्लेख
अजित पवार यांच्या घरावर धाड पडल्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे संबंध सुमधुर कसे?
पवार साहेब आज संजय राऊत यांच्यावर खूश आहेत, लवकरच टांगलेले दिसतील.
पवार साहेब खुश झाले की मला भिती वाटते असे मी म्हणालो होतो
अजित पवार यांच्या घरावर धाडी पडल्या सुप्रिया सुळे यांच्या घरावर धाडी का नाही पडल्या?
राज ठाकरे यांनी घेतला विरोधकांचा समाचार
देशात समान नागरी कायदा आणा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणा, राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी भूमिका घेणार मी पहिलाच.
कलम ३७० हटवल्यानंतर अभिनंदन करणारा मीच.
अशा नोटिशींना मी भीक नाही घालत.
शरद पवार यांना ईडीची नोटीस येणार होती, तरी त्यांनी किती नाटकं केली.
मला नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात आलो होतो.
ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक नाही बदलली.
नरेंद्र मोदींच्या अनेक भूमिका पटल्या नव्हत्या.
काही पत्रकार झाले, काही संपादक झालेत.
अनेक पत्रकार राजकीय पक्षाशी बांधील झाले आहेत.
परंतु ही सभा मोठी स्क्रीन दाखवून जम्मूमध्ये दाखवली जात आहे.
अनेक ठिकाणी ही सभा विजेच्या कारणामुळे दाखवण्यात येत नाहिये.
अनेक पत्रकार राजकीय पक्षाला बांधील असून ते विषय भरकटवतात.
हे तारे तोडले याचे उत्तर द्यावे लागेल
गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक नेत्यांनी तारे तोडले
माझा ताफा अडवणार हे गुप्तचर खात्याला कळाले परंतु शरद पवार यांच्या घरावर कोणी हल्ला केला हे गुप्तचर खात्याला माहित नाही.