प्रधानमंत्री जन धन योजनेचा राज्यात सुमारे २.८ कोटी खातेधारकांना मिळाला लाभ – चंद्रकांत पाटील,
आजपासून ६ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रधानमंत्री जन धन योजनेची सुरवात केली होती. देशातील प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असावे आणि प्रत्येक भारतवासी संघटित बँकिंग आणि आर्थिक सेवांचा लाभ मिळवू शकेल, हेच मुख्य उद्देश होता. असे उद्गार प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी काढले होते.
गेल्या सहा वर्षांपासून ही योजना सहा स्तंभांवर उभी आहे. बँकिंग सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश, ओव्हरड्राफ्ट सुविधांसह मूलभूत सेव्हिंग बँक खाते, आर्थिक साक्षरता, क्रेडिट गॅरेंटी फंडची निर्मिती, असंघटित क्षेत्रांसाठी मायक्रो इन्श्युरन्स आणि पेन्शन या मध्ये ही योजना यशस्वीपणे सुरू आहे.
आज देशात ४० कोटींपेक्षा अधिक लोकं जन धन योजना खातेधारक आहेत. महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० पर्यंत २.८२ कोटी जन धन लाभार्थी खातेधारक आहेत, ज्यामध्ये सध्या ८८५४.९९ कोटींची रक्कम बचत खात्यांमध्ये जमा आहे. संपूर्ण देशात ६३.६% ग्रामीण खातेधारक आहेत, जी अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आहे. महाराष्ट्रात १.४७ कोटी खातेधारक ग्रामीण क्षेत्रातून आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थने या योजनेचा लाभ घेतला, त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील आदर्श राज्य ठरले असून जे या योजनेचा प्रगतीशील विस्तार दर्शवित आहेत.
रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही अभ्यास करून बोलावं – फडणवीस
कोव्हीड-१९ महामारीच्या या कठीण काळात महिला जन धन खातेधारकांना केंद्र सरकारने एप्रिल ते जून २०२० च्या दरम्यान ५०० रुपये/महिना अशी आर्थिक मदत केली होती. या तीन महिन्यांच्या कालावधीत महिलांना एकूण ३०,७५० कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली.