पुणे : सध्या पुण्यात मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढत्याना दिसत आहे. त्यात आता महाराष्ट्रात लसीचा सुद्धा तुटवडा जाणवू लागला आहे.
त्यात शहराच्या नारायण पेठेतील लसीकरणाच्या मध्यवर्ती भांडारात केवळ ४ हजारच डोस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गुरूवारी अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी लसींचा साठा संपल्याने १०९ लसीकरण केंद्र बंद होते. ३९१ केंद्रांवर बुधवारी ५५ हजार ५३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पण, लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लसीकरण न करताच परत जावे लागत आहे.
आज जीव वाचविण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी संमती असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कृपया आम्हाला लसीचा पुरवठा करा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना केली आहे.
Pune District vaccinated 55,539 persons today in 391 vaccination centers today. Several thousand people went back without being vaccinated because the vaccines stock was exhausted…1/3
— Supriya Sule (@supriya_sule) April 7, 2021