टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपींना,१६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई – संपूर्ण देशातच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या पाचही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नव्याने एका आरोपीला काल (सोमवारी) उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना समोरासमोर बसवून त्यांचे जबाब नोंदवून तपास करायचा असल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
चॅनेलचा ‘टीआरपी’ घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात सुरुवातीला चार लोकांना अटक करण्यात आली. विशाल भंडारी, बोपेल्ली राव, बॉक्स सिनेमाचे नारायण शर्मा आणि फक्त मराठी चॅनेलचे शिरीष शेट्टी यांना अटक करण्यात आली आहे.
काल (सोमवारी) आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे आरोपीचे नाव असून तो हंसा रिसर्च प्रा. लि. या कंपनीचा माजी कर्मचारी आहे.