पत्राचाळ कुठेय हेच माहित नाहीय, ईडी चौकशीपूर्वी संजय राऊतांचे सूचक विधान

 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होत असून संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, पत्राचाळ कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संजय राऊत म्हणाले की, “माझा केंद्रीय तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. माझा काहीच गुन्हा नसल्यामुळे मी अत्यंत बेडरपणे चौकशीला सामारं जातोय. चौकशीला सामोरं जाण्याची हिम्मत माझ्यामध्ये आहे. मला असं वाटतं, या देशाचा नागरिक म्हणून, राज्यसभेचा खासदार म्हणून कोणत्याही तपास यंत्रणेच्या चौकशीला निर्भयपणे सामोरं जाणं आणि आपली बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे. मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास आहे.”

काय आहे प्रकरण

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले.

Team Global News Marathi: