पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं निष्ठावान १५ आमदारांना भावनिक पत्र

शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे मोठे खिंडार पडले आहे. पण या बंडखोरीमध्ये काही आमदार हे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेना पुन्हा एकदा नव्याने उभारली जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून नव्याने बांधणी सुरू आहे.

बंडखोरीच्या काळात अनेक आमदार सोडून गेले होते, पण जे राहिले अशा आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकनेकांवरच्या याचीकांवर निकाल जाहीर होणार आहे.

आता या निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत राहिलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आहे.’आईच्या दुधाशी बेईमानी करू नका’ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहात निष्ठेचे पालन केले आहे असे सुद्धा या पत्रात नमूद केले आहे

Team Global News Marathi: