अनिल देशमुखांवर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवर जयंत पाटील म्हणतात की,

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागूपर आणि मुंबईतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला असून गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर यावेळी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अर्थात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलं आहे.

या कारवाईवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. १० वर्षांपूर्वीचं प्रकरणं बाहेर काढून त्यावरुन एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. मोठे आकडे टाकून भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ही पध्दत असून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच खासदार सुरप्या सुळे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. यंत्रणेचा गैरवापर हे भाजपाचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: