‘वर्षा’पेक्षा सागर बंगल्यातच मी अधिक खुश, अस का म्हणाल्या अमृता फडणवीस ?

 

राज्यात भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार निवडणून येऊन सुद्धा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी करून महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्यामुळे भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले होते तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पिढी वर्णी लागली होती. या सर्व घडामोडीवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सतत ट्विटच्या माध्यमातून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसून आल्या होत्या.

त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गणेश वंदना’ या टायटलने हे साँग रिलीज करण्यात आलंय. त्याच अनुषंगाने माध्यमांशीनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी, विविध विषयांवर त्यांना बोलतं केलं. त्यात, तुमचा आवडता बंगला किंवा घर कोणतं?, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिलंय. नागपूरच्या घरी आपण एन्जॉय करायचे, असेही त्यांनी म्हटलं होत.

तसेच वर्षावरून सागर बंगल्यावर स्थलांतराबाबत विचारले असताना त्या म्हणाल्या की, मी नागपूरच्या घरी एन्जॉय केलं, आज इथं सागर बंगल्यातही एक मेंटल रिलीफ आहे. जे करायचंय ते मी करतेसुद्धा, कारण इथे पोझिशनचा प्रेशर नाही. त्यामुळेच, फ्रीडम ऑफ माईंडचा विचार केल्यास मी सागर बंगल्यात खूप खुश आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं. नागपूरच्या घरीही खूश होती, पण वर्षा बंगल्यात राहत असताना, या जागेचा फायदा लोकांसाठी कसा करता येईल, हाच विचार मी करायचे, असे अमृता यांनी लोकमतशी बोलताना म्हटले.

Team Global News Marathi: