Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावीची परीक्षा नाहीच; पण जूनमध्येच ‘या’ गुणांच्या आधारे लागणार रिझल्ट

by ग्लोबल न्युज नेटवर्क
May 29, 2021
in शैक्षणिक
0
केंद्राची ठाकरे सरकारला केराची टोपली, विद्यापीठाच्या परीक्षा होणार
ADVERTISEMENT

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयी निर्माण झालेला तिढा आता सुटला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्याविषयीचे धोरण तसेच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया याबाबतची घोषणा केली. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन होणार असून त्यासाठी नववी, दहावीतील प्रत्येकी 50 गुण ग्राह्य धरले जातील. अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक प्रश्नांवर आधारित सीईटी होणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, 10वी संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने आज उच्च न्यायालयाकडे दोन आठवडय़ांचा अवधी मागितला.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 1 जून रोजी पुढील सुनावणी होणार असून त्याअनुषंगाने आज शालेय शिक्षण विभागाने दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावी प्रवेश याविषयीचे शासन निर्णय जारी केले. राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर कायम असून दहावीचा निकाल कसा जाहीर करणार, अकरावी प्रवेश कसे होणार याविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत राज्य मंडळास परवानगी दिली आहे.#ssc #sscexam #InternalAssessment pic.twitter.com/CBd7rUbO2u

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 28, 2021

अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन सीईटी

ADVERTISEMENT

सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशात समान संधी मिळावी यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असेल. सदर परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून विद्यार्थ्यांना 100 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील तसेच ओएमआर पद्धतीने दोन 2तासांची परीक्षा घेण्यात येईल.

सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

…तर परीक्षेची संधी

अंतर्गत मूल्यमापनाआधारे तयार केलेल्या निकालाने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास अशा विद्यार्थ्यांना कोरोनाची परीस्थिती सामान्य झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुढील दोन परीक्षांना बसण्याची संधी मिळणार आहे.

असे होईल मूल्यांकन प्रत्येक विषयाचे 100

गुणांचे अंतर्गत मूल्यमापन

दहावीचे अंतर्गत लेखी मूल्यमापन

30 गुण

गृहपाठ, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा

20 गुण

नववी विषयनिहाय अंतिम निकाल

50 गुण

दहावीचे पुनर्परीक्षार्थी (रिपीटर), खासगी (फॉर्म – 17), तुरळक विषय घेऊन बसणाऱया विद्यार्थ्यांसाठीहीमूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. 

श्रेणीसुधार योजने अंतर्गत परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनात्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी कायमअसतील.

दहावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समितीकाम करणार आहे. 

निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱयांकडून करण्यात येईल.

शाळास्तरावर निकालात गैरप्रकार अथवा अभिलेखयामध्ये फेरफार झाल्यास शाळांचे निकाल रोखून धरणे, शिस्तभंग व दंडात्मक कारवाईबरोबरच शाळेची मान्यताकाढून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

राज्य मंडळामार्फत जून अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन असून त्यासाठी विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे वेळापत्रक शिक्षण मंडळामार्फत लवकरच जाहीर होणार आहे.

या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करणे शाळांना बंधनकारक असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठीचे प्रशिक्षणही शाळांना दिले जाणार आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अकरावीदहावी उत्तीर्णपरीक्षामहाराष्ट्र
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक: राज्यात कोरोना बधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त; मृत्यू संख्या ही घटली

Next Post

संभाजीराजेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही, अजित पवारांची ग्वाही

Next Post
संभाजीराजेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही, अजित पवारांची ग्वाही

संभाजीराजेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही, अजित पवारांची ग्वाही

Recent Posts

  • मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे; सदानंद सुळे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
  • राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच – संजय राऊत
  • विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केली भावनिक पोस्ट
  •  पुन्हा अजित पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा म्हणाले की, आधी किमती वाढवतात आणि मग….
  • अनिल परबांच्या अटकेनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group