ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या पक्षाचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही – देवेंद्र फडणवीस
ग्लोबल न्यूज: राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदार संघासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलाच सामना रंगला होता. या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकत्र निवडणूक लादल्यामुळे फायदा झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.
या निवडणुकीत भाजपला औरंगाबादसह बालेकिल्ला समाजाला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचे आमचे अंदाज चुकले. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू”.