रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय सतत महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबियांवर सतत टीका करताना दिसून येत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतं. हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात. मला वाटतं रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही, असं नारायण राणे म्हणाले. नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पवार ठाकरेंवर जोरदार आसूड ओढले.

आज मुंबईत सुमारे अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुफान बॅटिंग करत दादरा नगर हवेली, इंधन दरकपात, बारामतीमधला पवार-ठाकरेंचा कार्यक्रम, ईडी सीबीआयच्या धाडी आदी विषयांवर त्यांनी फटकेबाजी केली. तर राऊतांवर टीका करताना मात्र त्यांनी हात आखडता घेतला नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही

संजय राऊतांचे दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाला. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्टाच्या बाहेर आम्ही जिंकलो. सर्वस्त्र डंका पिटत आहेत, पण मला त्यांना सांगायचंय उमेदवाराची निशाणी फलंदाज होती. धनुष्यबाण नव्हती. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांना हास्यास्पद दावे करण्याची सवय आहे”, असं नारायण राणे म्हणाले.

Team Global News Marathi: