नारायण राणे ही गंजलेली तोफ, त्यातून आलेल्या गोळ्यांना आम्ही आणि मातोश्रीवरही किंमत नाही -जयंत पाटील

नारायण राणे ही गंजलेली तोफ, त्यातून आलेल्या गोळ्यांना आम्ही आणि मातोश्रीवरही किंमत नाही -जयंत पाटील

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधकांनी बेछुड आरोप ठाकरे सरकारवर लावलेले आहेत. त्यात भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यात मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री अडकले आहेत. त्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटींच कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत नेले असल्याचंही नारायण राणेंनी म्हटले आहे. आता त्यांच्या या टीकेला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

हे सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आरोप करत सुटले आहे. फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: