मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले

 

राज्याच्या राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिंदे यांनी बंड पुकारत नॉट रिचेबल झाले. हिंदुत्वाची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

तर दुसरीकडे वर्षावरील बैठक संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. विधानभवनात त्यांना यायवच लागेल असं शिवसैनिक म्हणाले त्याचसोबत उद्धवसाहेबांनी आदेश द्यावे या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

आजच्या बैठकीत ३३ आमदार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. पक्ष हा पक्ष असतो, शिवसेना आमदारांच्या कुटुंबाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. गैरसमज झाले असतील तर मुंबईत चर्चेला यावं. आम्ही कुणाचे निरोप घ्यायला बसलो नाही. गुजरातमध्ये गेलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर ते शिवसेनेत परततील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे.

Team Global News Marathi: