मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले – अतुल भातखळकर

मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले – अतुल भातखळकर

काल मुंबईत पडलेल्या धो-धो पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. तर मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळी येथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मंगळवारी रात्रीपासून तुफानी पावसामुळे आलेल्या पुरात मुंबईकर गळ्यापर्यंत बुडले तरी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटनात आणि ताजमहाल हॉटेलबरोबर करार करण्यात रमले आहेत, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

अनेक सखल भागांत पाणी साचले, रेल्वेसेवांवरही पावसाच्या पाण्याचा परिणाम झाला, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. मुंबई महापालिकेने या पावसातही पुन्हा मुंबई तुंबून दाखवली. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच ही वेळ आली आहे, अशी टीका सुद्धा भातखळकर यांनी केली होती. ही टीका करणारा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: