मराठा आंदोलनाच्या भीतीने मुंबई साचार बंदी लागू – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजाचे होणारे आंदोलन दाबण्यासाठी लावण्यात आले आहे असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर लावला आहे. ते आज कोल्हापूर येथे वृत्त समूहाशी संवाद साधताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कलम लावून मराठा आंदोलन सरकारला दाबता येणार नाहीत.
आघाडी सरकारने लवकरात लवकर कॅबिनेटची बैठक बोलावाली, तसेच १५०० कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करावे अशी मागणी त्यांनी बोलताना केली. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या कलम १४४ वर चंद्रकांतदादा पाटील यांनी भाष्य केले होते.
मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, १५०० कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी ६४२ कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.