बिहार निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली – अनिल परब
सुशांत सिहं राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ठ देण्यात आले आहे. यावर मुंबई आयुक्त परमवीर सिंग यांनी बोलताना मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी ८० हजार सोशल मीडियावर फेक अकाउंट्स उघडण्यात आल्याची माहिती मुंबई आयुक्तांनी दिली होती यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी वक्त्यव्य केले आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. राजपूत आत्महत्या प्रकरणाचा वापर काही संधीसाधू पक्षांनी आपल्या राजकरणासाठीच केल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची बदनामी करण्यासाठी उघडण्यात आलेल्या सोशल मिडियावरील बनावट अकाउंटचा लवकरच तपास होऊन सत्य बाहेर येईल देखील परब यांनी बोलून दाखविले.
एम्सनेदेखील सुशांत सिंहची हत्या नसून आत्महत्या असल्याचे सांगितल्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर आरोप करणारे शांत बसले आहेत. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजपूत मते मिळवण्यासाठी हे राजकारण करण्यात आले असा आरोप अनिल परब यांनी केला. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचे नेतृत्व केले. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱयांचा बिहारमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का ? असा प्रश्न त्यांनी केला.