नागरिकत्व कायदा हा चांगला कायदा आहे, परंतु या कायद्याप्रकरणी मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आली असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना काळात केंद्र सरकारने चांगली कामगिरी बजावली असेही भागवत म्हणाले. दसर्याा निमित्त संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरवर्षी नागपूरच्या रेशीम बागेत संघाचा दसऱ्य़ा निमित्त वार्षिक कार्यक्रम असतो. यंदा हा कार्यक्रम महर्षी व्यास सभागृहात अवघ्या 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी भागवत म्हणाले की “नागरिकत्व कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु ज्यांनी या कायद्याला विरोध केला त्यांनी मुस्लिम बांधवांना या कायद्यावरून दिशाभूल केली. त्याचा गैरफायदा घेऊन देशात हिंसाचार निर्माण केला असेही भागवत म्हणाले.
या कायद्यावर अजून चर्चा होणार होती पण नेमके कोरोनाचे संकट आले. त्यामुळे यावर चर्चा थांबली. आजही दंगलखोरांच्या मनात तो विषय सुरू आहे असे भागवत म्हणाले.