“मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!”

 

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान, यावर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला.

“आज महाराष्ट्रात राहून, सर्वकाही ओरपलं आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत. कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले

महाराष्ट्राची ओळख, मराठी माणसाची ओळख संपूर्ण जगाला आहे. परंतु राज्यपालांना नाही याची खंत आहे. आज मराठी माणसं तर चिडलेली आहेतच. ही मुंबई आहे ती कोश्यारींनी मराठी माणसाला आंदण दिलेली मुंबई नाही. संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई हक्कानं मिळवली आहे. १०५ हुतात्मे त्यासाठी झाले आहेत. राष्ट्रपतींचे हे दूत असताता. घटनेची शपथ घेताना जात पात धर्मापलिकडे जाऊन सांभाळ करणं आणि वागणूक देणं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यांनी हिंदुंमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Team Global News Marathi: